Parulekar’s Alchemistry

If alchemy, as cultural dictionary suggests, is considered to be the ancestor of modern chemistry, then Raju Parulekar, a writer penning his marathi column “alchemistry” can be referred a hubristic ‘chemist’.

Seriously, this man never ceases to amaze me.

एका सरड्याने इतके रंग बदलले...

मित्राने सरड्या वरील एक कविता मेल केली अन वाचून जी ए ची मानससरोवरावरील कावळ्यांची गोष्ट आठवली ज्यात जी ए जीवनाचं एक सूत्र सांगतात. स्वसंरक्षणाच्या संदर्भात तात्विक स्वर या पेक्षा हि व्यावहारिकता ही जास्त कामी येते हाच तो काय दोन्ही ठिकाणी संदेश.

एका सरड्याने इतके रंग बदलले...

एका सरड्याने इतके रंग बदलले
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना

तो म्हणाला,"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"

मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं

गवतावरच नाही तरमातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा

त्यांना या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला

सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपणत्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरीआपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं

पुणे आणि पुणेकर

पुण्यातल्या तऱ्हेवाईकपणा बद्दल पुणेकरांना नेमीच भरभरून बोलाव अस वाटत. नेहमीचच रुटीन जगतांना त्यांना त्यांच्या तऱ्हेवाईकपणा बद्दल बोलायचा डोस सतत हवा असतो. बऱ्याच वेळेस हा तऱ्हेवाईकपणा ते उसना आणतात. कधी कधी तर तो फारच कृत्रिम वाटतो.

जेव्हा ओरिजिनल विक्षिप्त लिखाण असलेल्या पाट्या दिसेनास्या होतात तेव्हा पुणेकर उगाच तसल्या पाट्या मेल करून उसना पुणेकरी पणा आणतात.

जगात जसे लंडनवासीय स्वतःला फारच श्रेष्ट समजतात किवा न्यूयॉर्क वासियांना सतत वाटत कि त्याचं च शहर सर्व श्रेष्ठ तसाच काहीसा प्रकार भारतात पुणेकरांबद्दल आहे.

अरुण टिकेकरांनी सांगितल्या प्रमाणे लोकांमध्ये असलेला तऱ्हेवाईकपणा हा कुठल्याही समाजाला पोषकच असतो. तऱ्हेवाईक लोक च प्रवाहाच्या विरुद्ध विचार करतात आणि ते विचार आचरणात आणतात. या तऱ्हेवाईकपण मुळे जीवनात सुद्धा एक थ्रील येत.

पुण्यात एकेकाळी असे तऱ्हेवाईक लोक खूप होऊन गेलेत आणि म्हणून च पुण्याने बऱ्याच चळवळींचे नेतृत्व केले.

पण आज हा उसना तऱ्हेवाईकपणा समाजाला, किंबहुना पुण्याला कुठे घेऊन जाईल ?